नाशिक मिरर वेबटीम :  नाशिक मध्ये पित्याने मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पित्याचे विवाहबाह्य संबंध असल्याने तसेच शेतीवर आमचाच वाटा आहे असा दावा मुलाने केला होतो.या वादामधून च वडिलांनी मुलांचा खून केल्यास उघड झाले आहे. मंगळवारी (दि.४) पहाटे जनरल वैद्य नगर येथे ही घटना घडली. निलेश प्रभाकर माळवाड असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर प्रभाकर माळवाड असे संशयित आरोपी पित्याचे नाव असून मुंबई नाका पोलिसांनी संशयित मारेकरी प्रभाकर याना अटक केली आहे. जयश्री प्रभाकर माळवाड यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे पतीचे विवाहबाह्य संबंध होते, त्यास मुलगा निलेश याचा विरोध होता. यावरून दोघं पिता पुत्रात नेहमी वाद विवाद होत असे. संशयित प्रभाकर हे निलेशला जीवे मारण्याची धमकी देत होते. दरम्यान प्रभाकर यांनी त्यांच्या नावावरील दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याचे निलेशला समजले. त्यामुळे निलेशने शेतीवर दावा केला. त्यावेळी प्रभाकर यांनी निलेशला तू काही काम धंदा करत नाही असे बोलून वाद घातला. त्यावेळी आईने मध्यस्ती करून वाद मिटवला. सोमवारी
रात्री जेवण करून तिघे जोपले असता प्रभाकर यांनी पहाटेच्या सुमारास निलेशला गळा आवळून खून केला. हा प्रकार समजताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित प्रभाकर यास ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या

Don`t copy text!