दि.२५. नाशिक मिरर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सत्तेला ३५५ वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ सरनौबत पिलाजी घराण्याचे तेरावे वंशज मारूती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली व गरुडझेप च्या माध्यमातून आग्रा ते राजगड हे १२०० किलोमीटर अंतर १४ दिवसात धावत पूर्ण करण्याचा मानस करत पुणे येथील ५७ शिवप्रेमी सतत धावत आहेत.

मोहीमेंतर्गत आज मंगरूळ फाटा येथे शिवज्योत रॅलीस देवळा सायकलिस्ट अरुण पवार यांनी भेट व स्वागत केले व शिवज्योत बरोबर रन ही केला मारुती आबा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

तसेच पिंपळगाव सायकलिस्ट नितीन डोखळे यांनी पिंपळगाव ते सोग्रस फाटा सायकलीने जाऊन शिवज्योत रॅलीचे स्वागत केले रॅली बरोबर ५ ते ६ की मी. रण केला, नितीन भाऊ यांच्या परिवाराने पाचोरवणी येथे शिवज्योतीचे व त्यांच्याबरोबर सर्व मावळ्यांचे औक्षण केले.तसेच शिवज्योत रॅली निमित्त ४८ की मी सायकलिंग केली

नाशिकचे सायकलिस्टचे संजय पवार यांनी नासिक ते वडाळीभोई असा सायकलीने प्रवास केला त्यांनी आज गरुडझेप ,शिवज्योत रॅली निमित्त १०१ की मी सायकलिंग केली शिवज्योत रॅलीचे स्वागत आणि सर्वांना नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
तसेच वडाळीभोई ते थेट नासिक पर्यंत त्यांच्या सोबतच होते.

गरुडझेप मोहिमेंतर्गत आग्रा ते राजगड हे १२०० कि मी अंतर अवघ्या १३ दिवसांत धावत पूर्ण करणारी शिवज्योत रॅली १७ ऑगस्ट या दिवशी आग्र्याहून निघाली आहे. या मशाल रॅलीचे नाशिक शिवारात आगमन झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा चार राज्यांतून, आग्रा ते राजगड हे अंतर धावत पुर्ण करणार आहेत.
गरुड झेप च्या शिवज्योत रॅलीच्या स्वागतासाठी नाशिक हुन मोठ्या प्रमाणात संस्था हजर होत्या.

गरुडझेप शिवज्योत रॅलीस नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी शुभेच्छा .

बातम्या

Don`t copy text!