मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि. ७: मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज येथे सांगितले.
कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेतली. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासन टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत आहे त्यामुळे गर्दी नियंत्रण आवश्यक असून दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच ज्यांचा लोकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बस चालक, वाहक यांची सातत्याने चाचणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे ५००० खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या रुग्णालयाचे काम करताना जनहित लक्षात घेऊन करावे, अशी सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.
पुढील वर्ष पूरमुक्त ठेवायचं नियोजन आताच करावं त्यासाठी नाले रुंदीकरण, खोलीकरण ही कामे हाती घ्यावीत त्याचबरोबर रस्ते तसेच अन्य विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुढील वर्ष पूरमुक्त ठेवायचं नियोजन आताच करावं त्यासाठी नाले रुंदीकरण, खोलीकरण ही कामे हाती घ्यावीत त्याचबरोबर रस्ते तसेच अन्य विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा मुंबईत कशा प्रकारे परिणाम झाला याबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्था अभ्यास करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या मोफत चाचण्यांसाठी मुंबईत सध्या २४४ केंद्र सुरू करण्यात आले असून दररोज २० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर मास्क न वापरण्यांवर कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
