जिल्हाधिकारी सूरज मांढरे याना निवेदन

नाशिक मिरर : गेल्या वर्ष भरापासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीचा कहर सुरू आहे.या जागतिक महामारीने एकूण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे.राज्यात तर कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे.परिणामी शेतकरी आणि सर्वसामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे शेतकऱ्याला उभी पिकं बाजारात विकता आली नाही. विक्रीसाठी आलेला द्राक्ष,डाळिंब, कांदा,टमाटा यासारख्या सर्व पिकांवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले त्यामुळे घेतलेले कर्ज सुध्दा शेतकऱ्याला फेडता आले नाही, दुसऱ्या बाजूला सरकारने कुठलीही आर्थिक मदत शेतकऱ्यांना देऊ केली नाही.अशातच राज्य शासनाने महावितरनास थकबाकी वसुली करण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे काही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे वर्षभरापासून तर काहीचे केवळ २ हजार रुपये वीजबिल थकीत आहे.लॉकडाऊन मधील वीजबिल माफ करावी अशी मागणी सर्वांनी केली होती.सदर मागणी तर सरकारने मान्य केली नाही. तर थकीत वीजबिले वसूल करण्यास वीजकनेक्शन कापले जात आहे.
राज्यामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्याने पिकवलं तरच सर्वसामान्य माणूस खाऊ शकतो राज्याची आर्थिक घडी ही सर्वस्वी शेतकऱ्याच्या भरोवशावर असताना त्या शेतकऱ्यांबाबत कायम दुजा भाव केला जात आहे.या काळात सरकारने वीज बिल भरू नका म्हणून शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यावेळी राज्याचे ज्येष्ठ शरदचंद्र पवार यांनीही त्यास पाठिंबा जाहीर केला होता.
आज त्यांच्या व आपल्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार शेतकऱ्याला अव्वाच्या सव्वा बिले पाठवून वीज बिले भरण्याची सक्ती करत आहेत व जे शेतकरी व नागरिक वीज बिल भरणार नाहीत,त्यांची तात्काळ वीज खंडित करावी असा अध्यादेश महावितरण ने काढलेला आहे त्याचा छाया क्रांतिवीर सेना जाहीर निषेध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी द्वारे केळवे होते. त्यामुळे यावेळी वीज बिलाच्या संदर्भात सुद्धा आपल्या कडून देखील पूर्वी प्रमाणे राज्यातील शेतकरी अपेक्षा करत आहे.शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहायचे सोडून शेतकऱ्याला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचं काम सध्याचे आपल्या सरकारमधील काही मंत्री करीत आहे.
म्हणून आपल्या सरकारला व सरकारमधील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण आपले राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा व त्यांना या संकटात मदत करावी.वाढीव दिलेली वीजबिले कमी करा व ती बिले भरण्यासाठी शेतकऱ्याला वाढीव मुदत द्या अन्यथा आपल्या या मंत्र्यांच्या कृतीचा शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी या त्यास विरोधा रस्त्यावर उतरला तर या सरकारला ते परवडणारे नसेल.
तरी छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने आपणास आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून विनंती करत आहोत की वीजबिल थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या अन्यथा राज्यभर आपल्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास सर्वस्वी आपले सरकारे व प्रशासन जबाबदार असेल. यावेळी निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देतांना छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, नाशिक जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात, नाशिक योगेश गांगुर्डे, आयटी विभाग प्रदेश कार्याध्यक्ष वैभव दळवी आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!